पोस्ट्स

जून, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विरहात खरोखरच जग वसते..

इमेज
'आता भेटू शकतो का?' 'बोल ना.!' 'बरं ठीक आहे! आपण बाहेर भेटू.!' 'नाही तर जाऊदे.!' 'बरं.. ऐक ना.!! आपण शेवटच भेटू एकदा.' तिच्या मघापासून येणाऱ्या मेसेजला वाचत होतो. पण मी उत्तर देत नव्हतो. कारण तिच्या भावनांचा होणारा गोंधळ मी समजू शकत होतो. पण शेवटच भेटू हे शब्द मला अस्वस्थ करून गेले. लगेच फोन हातात घेतला आणि तिला कॉल केला. पहील्या रिंगमध्ये तिकडून आवाज आला. "हॅलो.! बोल ना." मी,"काय झालं?" ती,"आपण वेगळं होण्याचा निर्णय जितका समजूतदार पणे घेतला.तितकं सोपं नाहीये माझ्यासाठी तुला दूर करणं." मी(हसून),"हे तर माझ्यासाठी सुद्धा सोपं नाहीये.! आपण फोन चा वापर खूप कमी करायचो कारण माहीत होतं. आपण बोलत जरी नसलो तरी एकमेकांसाठी आहे.पण.." (मला मधेच तोडत पुढे ती बोलू लागली) ती,"पण आता जास्त गरज वाटत आहे एकमेकांच्या आधाराची." मी,"तू काय म्हणत होती मघाशी.?" ती,"आपण भेटूया का? शेवटचं!" मी,"हम्म.. ठीक आहे कुठे भेटायचं?" ती(आनंदाच्या स्वरात),"बाहेर भेटू.! नाही न...

मनाला का जात नसावी.??

इमेज
           आयुष्यात अशा खूप चुका घडतात जेव्हा दोष कोणाचा हे सिद्ध करण्यात पूर्ण आयुष्य खर्च होतं आणि शेवटी कळतं ती तर कधी चूक नव्हतीच.ती फक्त त्या क्षणासाठी त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी किंवा त्या परिस्थितीला टाळण्यासाठी केलेली मलमपट्टी होती.पण मूळ गोष्ट पट्टीच्या खालून तशीच ठसठसत राहते. आणि ज्याची त्याला ती वेदना सहन करावीच लागते. त्यामुळे मी किंवा इतर कुणी कितीही सांत्वन केलं तरी ती वेदना काहीकाळानंतर जास्त त्रास देऊ लागते. मानवी जीवनातसुद्धा आठवणी कधी कधी जुन्या जखमेवरची खपली पडावी आणि रक्ताभंबाळ व्हावं तस माणसाला आतून रक्तभंबाळ करून सोडते.            आज ती साधारण 3 वर्षांनंतर भेटली. आता ती तितकी सुंदर दिसत नव्हती. कदाचित सुंदर आजही आहे पण मी त्या नजरेने तिला बघत नव्हतो. कारण तीच शेवटच वाक्य होतं," आपण या समाजाचे भाग आहोत.! आपण वेगळं होऊ! " मी आजही तिला दिलेला शब्द शरीराने पाळतो आहे. खरतरं तिची माफी मागायला हवी कारण मी आजही तिला मनातून वेगळं नाही करू शकलो. मी आजही प्रत्येक क्षणाला तिचं नसलेलं अस्तित्व माझ्या अस्तित...