पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुला कसं सांगु...

तुला कसं सांगु ....  तुला कसं सांगु, तुझ्या असण्याने मला फरक पडतो .  रखरखत्या उन्हात ,  तुझ्या केसांची सावली मला सुखावून जाते.  तुला कसं सांगु , तुझ्या असण्याने मला फरक पडतो.  तुझ्या गालावरची खळी आणि त्यावर  तोऱ्यात डुलणारी केसांची बट , मला नव्याने प्रेमात पाडते .  तुला कसा सांगु , तुझ्या असण्याने मला फरक पडतो.  माझ्या हास्यामागील दुःख क्षणात ओळखणारी तू, मला प्राणापेक्षा प्रिय आहे. पण हे सांगण्यात, माझा पुरुषी अहंकार मध्ये येतो.  तुला कस सांगु, तुझ्या असण्याने मला फरक पडतो.  - बुद्धभूषण जाधव 

आयुष्य...

आयुष्य.....  मरताना वाटलं आयुष्य  नुसतंच वाहुन गेलं  मला जगायचं ,जगायचं म्हणताना  माझं जगायचंच राहून गेलं ! आयुष्याच्या शेवटी असं वाटणार नाही  इतकं  'मस्त ' जगा ! छान वाटलं वाचायला पण मनात आला खरंच आपण आयुष्य जगतो का ? प्रत्येक व्यक्तीची जगण्याची व्याख्या वेगळी असते. पण आयुष्य तर सारख्याच नात्यात विणलेला असता ना,आपण कोणाचा तरी मुलगा,भाऊ,मित्र ,अशा विविध नात्यात असतो. मग जगणेच कसे विसरून जातो .  एकदा जगाला विसरून मनसोक्त हसून बघा . काळजात दडलेलं दुःखाला डोळ्यातील अश्रूतुन   वाट करून द्या. का जगणे  कळण्यासाठी पासून मरणाची वाट पाहतो ? आयुष्य खूप सुंदर आहे फक्त मनावरचा ओझं बाजूला ठेवून आपल्या माणसाबरोबर हसा,रडा ,त्यांना वेळ द्या . मग  बघा आयुष्य किती सुंदर होईल.  - बुद्धभूषण जाधव 

प्रेम...

प्रेम ...   प्रेमात पडणे हा शब्द मला मुळीच पटत नाही . व्यक्ती हा प्रेमात घडत असतो ,स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत असतो. प्रेमात आपल्याला आपल्या जोडीदारासमोर स्वतःला वेगळे दाखवण्याची गरज नसते. प्रेमात आपण जसे आहोत तसे व्यक्त होत असतो यात कुठलाही दिखाऊपणा  नसतो. आपण जसे आहोत तसे त्या व्यक्तीला आवडलेलो  असतो.  प्रेमात (मैत्रीत) Sorry,Thank YOu,Please म्हणायचे नाही असे प्रेमपंडित सलमान खान म्हणतात . पण खरं तर याचा नात्यात आपण सॉरी ,थँक्स  म्हणायला सुरुवात करावी कारण हे नातं सर्व नात्यापेक्षा निर्मल आणि पवित्र असते . प्रेमात माणूस दुसऱ्याच्या मताला ऐकून घेण्याची क्षमता विकसित करतो. समोरच्या व्यक्तीच्या अस्तित्वाची त्याला जाणीव होते.  आज हि आपल्या समाजात प्रेमाला चूक,पाप,वैगेरे वैगेरे नाव देऊन समाजाचे ठेकेदार मोकळे होतात. आपल्याकडे प्रेम या शब्दा पेक्षा लफडं हा शब्द जास्त प्रचलित आहे. कोणते तरी शायर त्यांच्या शायरीमध्ये म्हणतात  कि , किसी के दिल मे बसना बुरा तो नहीं ..  किसी के दिल में बसना खता तो नहीं ...  गुमराह  हैं ......