पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उगीच वाऱ्याच्या उनाडपणाचा खेद कशाला?

इमेज
तुम्ही कधी प्रेम केलंय? मी पण काय विचारतोय! केलंच असणार. घाबरून जाऊ नका.! मी काही तपशीलवार विचारणार नाही. विचारण्याचा उद्देश फक्त इतकाच की मी जे सांगणार आहे त्याच्याशी एकरूप व्हायला. ती एक आठवण पुरेशी राहील. जेव्हा आपण नवीन नवीन प्रेमात घडत असतो(मी पडणे म्हणत नाही. कारण प्रेम तुमच्यातील तुम्ही शोधून देतो). तेव्हा खूप गोष्टी या पहिल्यांदा होत असतात.म्हणजे बघा.. बऱ्याच वेळेला आपण शरीराने एका ठिकाणी असतो.पण मन मात्र भटकून येतं. काही वेळेला हवेची एखादी थंड जुळून आली की शहारून येत जणू प्रियकर/प्रियसी चा स्पर्श झाला. आपण नेहमी भविष्याचा विचार करतो. स्वप्न बघतो कारण आपल्याला ते मृगजळ हवं हवंस असतं.त्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तिच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा उमटत असतात.  "तुला माहीत आहे का?तुझ्या देहाचा मनमोहक गंध माझ्या रोमारोमात भिनला आहे."तिच्या हाताच्या बोटांशी खेळत मी तिला म्हंटलं. ती स्मितहास्य देत म्हणाली,"तू लेखक आहेसं.मला माहीत आहे पण कसं असतं ना.!रायटर साब.या गोष्टी पुस्तकात छान वाटतात." मी तिच्या चेहऱ्याजवळ चेहरा नेत तिला म्हंटल,"जसं आपल्याला एकमेक...

पती, पत्नी और वो..

इमेज
         दिनांक २७ सप्टेंबर २०१८ ला व्यभिचार हा गुन्हा ठरविणारा भारतीय दंडविधान संहितेतील कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला.खरं तर कायद्यात बदल होणे किंवा रद्द करणे हे तसं पाहता सामान्य असतं. कारण नवी पिढी नवी विचारसरणी घेऊन येते. काय होता कलम ४९७..            व्यभिचार किंवा बाहेरख्यालीपणा या कायद्यानुसार पत्नीने विवाहबाह्य संबंध ठेवल्यास त्या व्यक्तिविरुद्ध पती गुन्हा दाखल करू शकत होता.पण जर पतीचे विवाहबाह्य संबंध असेल तर पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची समानता पत्नीला नव्हती. अजून यात भर म्हणा किंवा पुरुषप्रधान संस्कृतीचे दर्शन.जर पत्नीचे विवाहबाह्य संबंध असेल तर पतीच्या गैरहजेरीत त्याचे नातेवाईक फौजदारी कलम १९८(२) अन्वये पत्नीविरुद्ध तक्रार करू शकत होते. म्हणून हे कलमही न्यायालयाने रद्द केले आहे. का? कधी? का बरं ? आला हा कायदा..            विवाह संस्थेचे अस्तित्व आणि पावित्र्य राखण्यासाठी हा कायदा लॉर्ड मेकॉलच्या काळात म्हणज...