पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अजीब दास्ता है ये.!!

इमेज
कोई मंगदा मेरा सी समां कोई हौंदा सूरत ते फ़िदा कोई मंगदा मेरी सी वफ़ा ना तो मंगदा मेरियां बला.. हे ऐकलं आणि चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. आणि खचाखच भरलेल्या लोकलच्या गर्दीत डोळ्याने शोधू लागलो कोणाच्या मोबाईलची रिंगटोन आहे. आणि नजर दारात उभ्या चार पाच मुलींच्या गोळक्यावर थांबली. खूप प्रयत्न केला तिला बघण्याचा पण आणि ती दिसली. पांढऱ्या रंगाचा रुमाल बांधलेली. त्यामुळे चेहरा काही दिसला नाही. पण मोबाइल कानाला लावला तेव्हा तिच्या हाताच्या नखांवर केलेलं नक्षीकाम जाम आवडलं. लोकलच्या गर्दीतून एक एक पाऊल पुढे सरकणे किती अवघड हे सर्वांनाच माहीत. तरी मी जीवाची बाजी लावून प्रयत्न करत होतो. पण.. मी ध्येय गाठण्यापूर्वीच तिने ध्येय गाठलं. म्हणजे तीच स्टेशन आलं. मग काय? तोंड पाडून बसण्याशिवाय पर्याय नव्हता. माझं आता रोजच काम झालं होतं ती आज दिसेल,आज दिसेल,आज दिसेल पण ती काही दिसेना. असेच २१ दिवस गेले. २२ व्या दिवशी मी तिचा थोडाही विचार न करता. बसायला जागा भेटली या आनंदात खिडकीतून बाहेर बघत होतो तितक्याच बाजूला एक मुलगी येऊन बसली. तिच्या Perfume चा सुगंध छान होता. म्हणजे दिवसभराचा थकवा गेला. मी तिच्य...

ढगाला लागली कळ..

इमेज
पाऊस.!! हा माझा आवडता विषय होता शाळेत असताना.नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर पाऊस आवडीचा विषय कधी जिव्हाळ्याचा झाला कळालचं नाही. पाऊस म्हणजे काय? तर समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन ती ढग तयार होतात आणि पाऊस बरसतो. हे झालं विज्ञानाच्या पुस्तकातलं उत्तर. पण तसं नसतं, पाऊस म्हटल की सर्वात अगोदर आपल्या डोक्यासमोर येत राज कपूर आणि नर्गिस यांच्यावर चित्रित झालेलं गाणं,'प्यार हुआ इकरार हुआ हैं, प्यार से फिर क्यू डरता हैं दिल।' पाऊस म्हणजे काय.? तर मी मुद्दाम छत्री घरी विसरणे. तू दिसली मी मित्राच्या खांद्यावर हात ठेवून उगीच त्याला पटवून द्यायचं की छत्री कशी घरी राहिली! आणि मग तू जवळ येऊन काहीही न म्हणता छत्री माझ्या डोक्यावर धरायची आणि तिथे एकमेकांशी काहीही न बोलता चालू लागायचं. कॉलेजच्या गेटच्या थोडं पुढ आलं की तू नेहमीप्रमाणे विचारायचं,"आज छत्री विसरला? की मुद्दाम नाही आणली!" आणि मी फक्त तुझ्याकडे बघून डोळे मीचकवायचे. तू उगीच चिडायचं आणि थोडी दूर होत मला पावसात भिजवायची. आणि मनसोक्त हसून घ्यायचं. मी पण उगीच राग आल्याप्रमाणे काहीही न बोलता पुढे चालत राहायचं.तू सगळ्या र...

ब्रेकअप के बाद जिंदगी..

इमेज
'प्रेमात पडण्याआधीच, move on ची तयारी असावी.' मी या मताचा माणूस आहे. म्हणजे होतो. काय म्हणालात? अडखळलो मी? नाही हो.! अडखळलो कुठे.! ते तर आपलं असंच. पण खरं सांगू.! हो.! मी अडखळतो.! जेव्हा प्रेमाचा मुद्दा येतो. मी अडखळतो जेव्हा विरह येतो. त्यात दुःख, कोसळणं, कोलमडण असं काहीच नसतं. त्यात असतो हरवलेला सहवास.संपलेला संवाद.दुरावलेलं मन.आणि सावरलेले आपणं. प्रेमात माणूस पडतो. तर त्यातून बाहेर पडताना घडतो. काय.? त्याच कारण.? 'मी'पणा.! अहो.! खरचं भुवया काय उंचावता. जर तुमच्यात 'मी'पणा नसेल तर तुम्ही तिथेच गुटमळत राहणार.! आणि हे धोकादायक असतं. त्यामुळे त्यातून बाहेर पडा. कसं? त्या व्यक्तीला विसरून? नाही हो.! संशोधन सांगते की ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम केलं त्या व्यक्तीपासून दूर झाल्यावर,वेगळं झाल्यावर त्याच्या आठवणीतुन बाहेर येण्यासाठी( आठवणीतून बाहेर येण्यासाठी विसरण्यासाठी नव्हे) पूर्ण 30 वर्ष लागतात. म्हणजे माणसाच्या सरासरी आयुष्याच्या १/३ काळ हा आपण एखाद्या व्यक्तीला विसरण्यासाठी खर्च करतो पण हाती काय येत? निराशा. कसं असतं आपल्याला कितीही वाटलं मला त्...

प्रेम खूप हतबल असतं..

इमेज
            पहिलं प्रेम, पहिली भेटं, पहिला स्पर्श, पहिल्यांदा चहा एका कपातून घेणं, मुसळधार पावसात एखाद्या मुलीसोबत एकाच छत्रीतून जाणं.(विनाकारण डोक्यात प्यार हुआ इकरार हुआ.. गाणं चालू असतं) हे सगळं विसरणं तस अवघड असतं. कारण ते सगळं पहिलं असतं. त्या पहिल्या शब्दासोबत येणारी अनामिक भीती. जाणते अजाणतेपणे असलेली ओढ.            माणूस प्रेमात असला की स्वतःचे वेगळे विश्व निर्माण करतो. असे विश्व जिथे जात, धर्म, वर्ण या गोष्टींना मानणारा समाज नसतो. आणि असला तरी त्यांना जुमानेलं ते प्रेम कसलं? पण बऱ्याचदा पहिलं प्रेम हे त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहचत नसतं. त्या प्रेमाचा प्रवास नको त्या वळणावर थांबत असतो. आणि ते वळण म्हणजे जिथून U टर्न घ्यायचा मार्गच नसतो. कारण त्या पहिल्या प्रेमात माणूस पुरता वेडा झालेला असतो. वाहवत तर इतका जातो की त्याला नंतर स्वतःला शोधणे अवघड होऊन बसतं.            त्यांनतर अचानक वेगळं झालं की आयुष्यात एक खालीपण येतं...

प्रेमाची लज्जत विरहात जास्त खुलते..

इमेज
तीन महिने... म्हणजे नव्वद दिवस.. म्हणजे एकवीसशे साठ तास.. असाच हिशेब मी तू दूर गेली तेव्हापासून ठेवतोय. तू माझ्यापासून दूर झाली. तेव्हापासून एक प्रश्न पडतो. दिवसामागून रात्र का येत असावी.??? दिवसभराच्या कटकटी,शीण एकमेकांच्या बाहुपाशात विरघळून टाकण्यासाठी.. निरव शांततेत अंतर्मनाच्या शंका ऐकण्यासाठी.. दिवसभराच्या सुखदुःखांची आपसात विभागणी करण्यासाठी.. रात्र आवश्यक असते. पण विरहाला मात्र रात्र हा फार मोठा शाप आहे. दिवसभर नाना कार्यात गुंतवलेलं मन रात्री पिसाट बनतं या विरहात..            आपण वेगळं झालो. तीन महिने झाले आणि आता रात्र काही सरेना. एक  एक क्षण.. कालचक्राची गती थांबली, अडून बसलेल्या बैलासारखी.! ज्या शय्येवर तू आणि मी एकमेकांच्या बाहुपाशात बद्ध होऊन कित्येक रात्री जागवल्या, त्याच शय्येवर आता एकटाच.. या एकटेपणाची जाणीव.. त्या स्मृती... ते स्पर्श... ती आलिंगने... मनानं कसा बांध साहावा.!              असं म्हणतात की प्रेमाची लज्जत विरहात जास्त खुलते. पौर्णिमेच्या टिप...

विरहात खरोखरच जग वसते..

इमेज
'आता भेटू शकतो का?' 'बोल ना.!' 'बरं ठीक आहे! आपण बाहेर भेटू.!' 'नाही तर जाऊदे.!' 'बरं.. ऐक ना.!! आपण शेवटच भेटू एकदा.' तिच्या मघापासून येणाऱ्या मेसेजला वाचत होतो. पण मी उत्तर देत नव्हतो. कारण तिच्या भावनांचा होणारा गोंधळ मी समजू शकत होतो. पण शेवटच भेटू हे शब्द मला अस्वस्थ करून गेले. लगेच फोन हातात घेतला आणि तिला कॉल केला. पहील्या रिंगमध्ये तिकडून आवाज आला. "हॅलो.! बोल ना." मी,"काय झालं?" ती,"आपण वेगळं होण्याचा निर्णय जितका समजूतदार पणे घेतला.तितकं सोपं नाहीये माझ्यासाठी तुला दूर करणं." मी(हसून),"हे तर माझ्यासाठी सुद्धा सोपं नाहीये.! आपण फोन चा वापर खूप कमी करायचो कारण माहीत होतं. आपण बोलत जरी नसलो तरी एकमेकांसाठी आहे.पण.." (मला मधेच तोडत पुढे ती बोलू लागली) ती,"पण आता जास्त गरज वाटत आहे एकमेकांच्या आधाराची." मी,"तू काय म्हणत होती मघाशी.?" ती,"आपण भेटूया का? शेवटचं!" मी,"हम्म.. ठीक आहे कुठे भेटायचं?" ती(आनंदाच्या स्वरात),"बाहेर भेटू.! नाही न...

मनाला का जात नसावी.??

इमेज
           आयुष्यात अशा खूप चुका घडतात जेव्हा दोष कोणाचा हे सिद्ध करण्यात पूर्ण आयुष्य खर्च होतं आणि शेवटी कळतं ती तर कधी चूक नव्हतीच.ती फक्त त्या क्षणासाठी त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी किंवा त्या परिस्थितीला टाळण्यासाठी केलेली मलमपट्टी होती.पण मूळ गोष्ट पट्टीच्या खालून तशीच ठसठसत राहते. आणि ज्याची त्याला ती वेदना सहन करावीच लागते. त्यामुळे मी किंवा इतर कुणी कितीही सांत्वन केलं तरी ती वेदना काहीकाळानंतर जास्त त्रास देऊ लागते. मानवी जीवनातसुद्धा आठवणी कधी कधी जुन्या जखमेवरची खपली पडावी आणि रक्ताभंबाळ व्हावं तस माणसाला आतून रक्तभंबाळ करून सोडते.            आज ती साधारण 3 वर्षांनंतर भेटली. आता ती तितकी सुंदर दिसत नव्हती. कदाचित सुंदर आजही आहे पण मी त्या नजरेने तिला बघत नव्हतो. कारण तीच शेवटच वाक्य होतं," आपण या समाजाचे भाग आहोत.! आपण वेगळं होऊ! " मी आजही तिला दिलेला शब्द शरीराने पाळतो आहे. खरतरं तिची माफी मागायला हवी कारण मी आजही तिला मनातून वेगळं नाही करू शकलो. मी आजही प्रत्येक क्षणाला तिचं नसलेलं अस्तित्व माझ्या अस्तित...

माझं आयुष्यभराचं व्यसन..📚📚

इमेज
किताबें.. पुस्तके.. माझं आयुष्यभराचं व्यसन. अगदी लहानपणीच आईच्या साक्षीने सुरू झालेले हे व्यसन. साधारण तीन साडेतीन वर्षाचा असेल तेव्हा आईसोबत शाळेत जायचो. आई ग्रंथपाल असल्यामुळे पुस्तकाच्या सानिध्यात दिवस जात होता. पण फक्त पुस्तक उघडून चित्र तरी किती दिवस पाहणार आणि एका ठराविक काळानंतर मला ते काम खूप रटाळ वाटू लागलं म्हणूनच की काय मी वयाच्या चौथ्या वर्षी शाळेत जाण्याआधीच वाचायला शिकलो.(आजची मराठी शाळेची स्थिती पाहून हे खोटं वाटत बऱ्याच वेळेला) पण हो मी शाळेत जाण्याआधी पुस्तकात रमायला शिकलो.आणि इतकं रमलो की पुस्तकाबद्दल असलेलं माझं प्रेम दिवसागणिक वाढत गेलं पण कमी नाही झालं. असं म्हणतात की 'पुस्तक हा माणसाचा Best Friend असतो.' पण मला कधी हे पटलंच नाही. म्हणजे बघा.. माझ्यासारखा नास्तिक माणूस जो ईश्वराचे अस्तित्व नाकारतो. तो पुस्तकासमोर नतमस्तक होतो. पुस्तकाला चुकून पाय लागला किंवा हातातून पडलं तर लगेच पाया पडतो. यासाठी नाही की मला त्यात देव सापडला पण यासाठी की मला त्यात गुरू सापडला. पुस्तक हा कितीही  जिव्हाळ्याचा विषय असला तरी त्याच्या जोडीने डायरी, वही, पत्र आणि हो गु...

अपनी माँझी कि जुस्तुजू में बहार...

इमेज
आज तिचा मेसेज आला,'कसा आहेस? I Hope विसरला नसशील.!' माझ्या फोन मध्ये तिचा नंबर आजही सेव्ह आहे.म्हणून विसरण्याचा प्रश्नच नव्हता. मी ही रिप्लाय दिला थोडा खोचकपणे,'नाही तुला कसं विसरेल? आयुष्यातला सर्वात मोठा काळ तुला Best Friend म्हणण्यात घालवला. आणि कसं असतं कधी कधी आपल्या भूतकाळाशी संवाद साधण्यात आनंद असतो नाही का?"            आता ती ऑनलाइन दिसत होती पण रिप्लाय देत नव्हती. कदाचित विचार करत असेल काय बोलू? कसं बोलू? आणि जेव्हा हे दोन प्रश्न दोघांमध्ये येतात तेव्हा समजावं आपलं नात एकतर संपलय किंवा नात शेवटच्या घटका मोजत आहे. तसं पाहता आमचं नात तेव्हाच संपलं होतं आता उरल्या होत्या फक्त त्या नात्याच्या छटा ज्या आता संध्याकाळ झाली म्हणून अंधुक झाल्या होत्या आणि अंधार पडल्यावर दिसणार नाही असा मला विश्वास आहे.            प्रत्यक्षात तो काळ संपल्यानंतरही त्याच्या स्मृती आपल्या मनात घर करून असतात.त्यांच्या अस्तित्वाचा खेळ सदैव चालूच राहतो आणि मग 'बीते रिश्ते तलाश करती हैं.!' ही केवळ गुलजारच्या गझलची एक ओळ न राहता परत परत भूतकाळात...